निकष पसाऱ्याचे...
आजूबाजूच्या पसाऱ्याचा, अडगळीचा, विचार करताना मागे Opra ह्या talk show मध्ये ऐकलेली मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आठवली.. आणि मग शोधाशोध सुरु झाली.. मिनिमलिझम हे सूत्र किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं.
"उतू नको, मातु नको" ही आजी-आई ने दिलेली शिकवण ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती.. कोणत्याही भारतीय व्यक्तीला काटकसर, पुनर्वापर, कमीतकमी वस्तुंचा संचय, साधी रहाणी या मिनिमलिझमच्या मुलभूत संकल्पना काही वेगळ्या नाहीत..
'अती समृद्धता आणि अभाव ही राहणीमानामधली दरी सांधण्याचे सामर्थ्य मिनिमलिझम विचारसरणीतच आहे'.. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंचा वापर ही जीवन पद्धती स्वतः अंगीकारून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा पाया घालून दिला... तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे असे मला वाटते.
मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या खाजगी मालमत्तेमध्ये, त्यांचे रोजच्या वापरातले घड्याळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता.. ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा सिद्ध करायला पुरेशी आहे.. 'अल्टीमेट मिनिमलिस्ट' म्हणून महात्मा गांधींचे नाव अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच..
'भौतिक जीवन, भौतिक वस्तू नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते' ही बुद्धाची विचारसरणी मिनिमलिझमच्या जवळ नेणारी आहे.. आणि हीच विचारसरणी झेन तत्त्वज्ञानाचा मूळ स्त्रोत पण आहे.
कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवन पद्धतीचा तर नक्कीच नाही..
अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं हे ही आपल्याच हातात असतं.. पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे ’लेट गो’ करण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची अक्षमता. त्यात कधी भावनिकता आड येते तर कधी आठवणी तर कधी भविष्याची सोय.. आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफिकिरी हे ही कारण असू शकते.. तेव्हा करणे शोधत बसण्यापेक्षा, 'उठा आणि फ़ेकून द्या, किंवा रिसायकल करा..'
पसारा आवरताना, एखादी वस्तू नको आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निकष कसा लावायचा?
१. काय फेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर काय ठेवायचं याचा विचार आधी करायचा. त्या वस्तूकरता जागा निर्माण करायची.
२. अजून एक पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहायची - ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. अर्थात ’ठेवणे’ ह्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत आपल्याकरिता नाही ;-)
३. एक सोपी पण काहीशी वेळखाऊ पद्धत म्हणजे रोज एक वस्तू टाकून द्यायची किंवा देऊन टाकायची.
सगळे कपडे, पुस्तकं, वस्तू वेगवेगळे करून एक एक कपडा, पुस्तक, वस्तू हातात घेऊन, निरखून खालील प्रश्न स्वतःला विचारायचे..
तुम्हाला खरंच ती हवी आहे का?
त्याचा वापर रेग्युलरली केला जातो का?
त्या वस्तूकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होते का?
अजुनी अशी वस्तू किंवा ह्यासारखी दुसरी वस्तू आहे का?
नसेल तर असलेल्यातील दुसरे काही वापरू शकतो का?
खूप महागडी आहे म्हणून ती टाकवत नाही का?
कोणीतरी दिलेली भेट, आठवण आहे का? त्यात भावना गुंतल्या आहेत का?
असुदे कधी गरज पडली तर.. असे वाटते का?
दुसऱ्या कोणाला ह्या वस्तूचा चांगला उपयोग होईल का?
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःसाठी करता तेव्हा ठराविक मर्यादेपर्यंत त्याचे अवलंबन करणे शक्य वाटते.. पण जेव्हा संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यांना ह्या सूत्रात बांधणे शक्य होईल का? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, मानसिकता वेगळी असते.. नाहीतर पसारा परवडला अशी परिस्थिती व्हायची.. :-)
मिनिमलिझम वर अभ्यास केल्यावर, माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि, कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तूंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर हे विचार आपल्यात रुजत नाहीत, तोवर हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.. बदल हा नेहमी आतून बाहेर व्हायला हवा.. विचार बदलले कि आचारात बदल नक्कीच होतो..
'गरजा आणि इच्छा या मधला नेमका फरक ओळखून साधेपणाने, तणावरहित जीवन जगणे'.. हा पण मिनिमलिझम च नाही का?
ह्या वर्षा अखेरपर्यंत घरातील पसारा आवरेन म्हणते.. बघू कसे काय जमते ते..
-मी मधुरा..
४ सप्टेंबर २०२०
आजूबाजूच्या पसाऱ्याचा, अडगळीचा, विचार करताना मागे Opra ह्या talk show मध्ये ऐकलेली मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आठवली.. आणि मग शोधाशोध सुरु झाली.. मिनिमलिझम हे सूत्र किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं.
"उतू नको, मातु नको" ही आजी-आई ने दिलेली शिकवण ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती.. कोणत्याही भारतीय व्यक्तीला काटकसर, पुनर्वापर, कमीतकमी वस्तुंचा संचय, साधी रहाणी या मिनिमलिझमच्या मुलभूत संकल्पना काही वेगळ्या नाहीत..
'अती समृद्धता आणि अभाव ही राहणीमानामधली दरी सांधण्याचे सामर्थ्य मिनिमलिझम विचारसरणीतच आहे'.. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंचा वापर ही जीवन पद्धती स्वतः अंगीकारून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा पाया घालून दिला... तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे असे मला वाटते.
मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या खाजगी मालमत्तेमध्ये, त्यांचे रोजच्या वापरातले घड्याळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता.. ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा सिद्ध करायला पुरेशी आहे.. 'अल्टीमेट मिनिमलिस्ट' म्हणून महात्मा गांधींचे नाव अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच..
'भौतिक जीवन, भौतिक वस्तू नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते' ही बुद्धाची विचारसरणी मिनिमलिझमच्या जवळ नेणारी आहे.. आणि हीच विचारसरणी झेन तत्त्वज्ञानाचा मूळ स्त्रोत पण आहे.
कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवन पद्धतीचा तर नक्कीच नाही..
अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं हे ही आपल्याच हातात असतं.. पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे ’लेट गो’ करण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची अक्षमता. त्यात कधी भावनिकता आड येते तर कधी आठवणी तर कधी भविष्याची सोय.. आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफिकिरी हे ही कारण असू शकते.. तेव्हा करणे शोधत बसण्यापेक्षा, 'उठा आणि फ़ेकून द्या, किंवा रिसायकल करा..'
पसारा आवरताना, एखादी वस्तू नको आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निकष कसा लावायचा?
१. काय फेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर काय ठेवायचं याचा विचार आधी करायचा. त्या वस्तूकरता जागा निर्माण करायची.
२. अजून एक पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहायची - ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. अर्थात ’ठेवणे’ ह्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत आपल्याकरिता नाही ;-)
३. एक सोपी पण काहीशी वेळखाऊ पद्धत म्हणजे रोज एक वस्तू टाकून द्यायची किंवा देऊन टाकायची.
सगळे कपडे, पुस्तकं, वस्तू वेगवेगळे करून एक एक कपडा, पुस्तक, वस्तू हातात घेऊन, निरखून खालील प्रश्न स्वतःला विचारायचे..
तुम्हाला खरंच ती हवी आहे का?
त्याचा वापर रेग्युलरली केला जातो का?
त्या वस्तूकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होते का?
अजुनी अशी वस्तू किंवा ह्यासारखी दुसरी वस्तू आहे का?
नसेल तर असलेल्यातील दुसरे काही वापरू शकतो का?
खूप महागडी आहे म्हणून ती टाकवत नाही का?
कोणीतरी दिलेली भेट, आठवण आहे का? त्यात भावना गुंतल्या आहेत का?
असुदे कधी गरज पडली तर.. असे वाटते का?
दुसऱ्या कोणाला ह्या वस्तूचा चांगला उपयोग होईल का?
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःसाठी करता तेव्हा ठराविक मर्यादेपर्यंत त्याचे अवलंबन करणे शक्य वाटते.. पण जेव्हा संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यांना ह्या सूत्रात बांधणे शक्य होईल का? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, मानसिकता वेगळी असते.. नाहीतर पसारा परवडला अशी परिस्थिती व्हायची.. :-)
मिनिमलिझम वर अभ्यास केल्यावर, माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि, कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तूंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर हे विचार आपल्यात रुजत नाहीत, तोवर हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.. बदल हा नेहमी आतून बाहेर व्हायला हवा.. विचार बदलले कि आचारात बदल नक्कीच होतो..
'गरजा आणि इच्छा या मधला नेमका फरक ओळखून साधेपणाने, तणावरहित जीवन जगणे'.. हा पण मिनिमलिझम च नाही का?
ह्या वर्षा अखेरपर्यंत घरातील पसारा आवरेन म्हणते.. बघू कसे काय जमते ते..
-मी मधुरा..
४ सप्टेंबर २०२०
👌👌👍
ReplyDelete